धुळेअन्य घडामोडी

भाजपाला मोठी किंमत चुकवावी लागेल; मा.आ.अनिल गोटे यांचा हल्लाबोल.!

खान्देश वार्ता-(धुळे)
भाजपातील गुजराथ धार्जीने नेते हेतुतः जाणुन, बुजून, मराठा समाजाचा अपमान करीत आहेत. तडीपार नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाना तीन-तीन दिवस टांगून ठेवणे हा तर, राजांचा घोर अवमान.!३५० वर्षापुर्वी छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली त्याचा सूड घेत आहेत. भाजपाला मोठी किंमत चुकवावी लागेल. विकासपुरूष कार्यसम्राट माजी आमदार अनिल गोटे यांचा हल्लाबोल.!

छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल ३५० वर्षापुर्वी तत्कालीन व्यापारी शहर असलेल्या सुरतेतील इंग्रजांच्या व मोगलांच्या वखारी लुटल्या होत्या. महाराजांच्या जीवनातील सुरतेची लूट व आग्ग्राहुन सुटका, अफझलखानचा वध इत्यादी प्रसंग जगाच्या इतिहासात नोंदले गेले आहेत. त्याच गुजराथचे नेते महाराष्ट्रातील गुजराथ धार्जीन्या मराठी नेत्यांना लाचार करून छत्रपती शिवरायांचा सूड उगवत आहेत. असे माझे स्पष्ट मत आहे. ज्यांची स्वतःची पार्श्वभुमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. मनुष्यहत्ये सारखे गंभीर गुन्हे ज्यांच्यावर होते. स्वतः तडीपार असल्याने तोंड लपवून फिरत होते. अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांच्या हातात सत्तेची सुत्रे आहेत. राज्यातील मराठा समाजाचा हेतूतः अपमान करून विकृत आनंद घेत आहेत.

महाराष्ट्रातील गुजराथ धार्जीन्या स्वाभिमान शून्य उच्चवर्णीय नेत्यांना हाताशी धरून आता तर, त्यांनी प्रत्यक्ष छत्रपतींच्या वंशजांचाच अपमान करण्यापर्यंत मजल गेली आहे. शिवरायांचे वंशज साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना तीन दिवसांपासून भेटीसाठी पाच/सात मिनीटांचा सुध्दा वेळ न देता तिकीटासाठी लटकत ठेवले आहे.

यापुर्वी साताऱ्यांची जन्मभुमी असलेले मराठा नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सख्या काकांचा घात करणारे प्रती सूर्याजी पिसाळ बारामतीचे अजित पवार यांची अवस्था तर घंटी वाजवल्या नंतर ‘जी साहेब’ म्हणून धावत येणाऱ्या शिपायासारखी करून टाकली आहे.

बारा/बारा, पंधरा/पंधरा दिल्ली वाऱ्याकरून सुध्दा दिल्लीतल्या शंहशहा व बादशहाने नुसती आश्वासनाची खैरात करून बोळवण केली आहे. दिल्ली वारी करण्याकरीता विमानात बसण्यापुर्वी महाराष्ट्रातील जनतेला ‘आता यादी मान्य होईल’ असे सांगून बसतात. दिल्लीला जावून नेत्यांच्या वेटींग लिस्ट मध्ये नाव नोंदवून तास-तास ताटकळत बसतात. बाहेर आल्यावर कसलेल्या कलाकारांप्रमाणे चेहऱ्यावर हास्य आणून निर्लजपणे सांगतात की, ‘दोन दिवसांनी पुन्हा आम्ही बसणार आहोत’.

महाराष्ट्राची कधी नव्हे, एवढी अब्रू देवेंद्र फडणवीस नावाच्या कुटील, कपटी भाजपा नेत्याच्या नेतृत्वाखालील सरकारने केली आहे. दिल्लीश्वरांच्या दरबारात सरदारांच्या रांगेमध्ये उभे केले, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष औरंगजेबाला ललकारले होते. त्या शिवरायांचा महाराष्ट्र आज शहंशहाच्या चरणी लोटांगण घालीत आहेत. यापेक्षा महाराष्ट्राचे दुर्देव काय आहे? असा सवाल लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार, कार्यसम्राट अनिल अण्णा गोटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − 6 =

Back to top button