
उचलचोखंड्यांनी तोंड चोमडेपणा करू नये.. डंके की चोट पर…!
(धुळे शहर वाहतूक शाखा भाग-१)
खान्देश वार्ता-(धुळे)
लतखोर आणि चटावलेले शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील काही दिवटे हे वाहनधारकांना लुटत आहेत. त्यांचे काम वाहतूक शिस्त लावण्यापुरते सिमीत आहे. वाहनधारकांना लुटून घर भरणे नव्हे. अनेक बेरोजगार कर्ज काढून वाहने घेतात त्यांची हाय अशांना आणि त्यांची भलावण करणार्यांना लागेलच.
अव्वाच्यासव्वा तोंड फाडल्यावर जीव वाचवण्यासाठी एखाद दुसरा फोन लावतही असेल. अपेक्षा ऐवढीच की जेवढे डाचे फाडले आहे, त्यात काही तरी उन्नीसबीस होईल, अशी माफक अपेक्षा कोणाची ही असू शकते. दुसरीकडे साहेबांच्या आणि पालकांच्या डायरीतील वाहनांना अडवण्याची हिम्मत नाही. अन दाखवलीच तर फोनवरून फाडली जाते. ही बाब भलावण करणार्यां उकलचोखंड्यांना माहिती असुनही तोंडचोमडेपणा केला जातो. आम्ही फोन नाही पेन लावतो तोही “खुलेआम डंके की चोट पर”… हे भलावण करणार्यांनी लक्षात ठेवत तोंड खुपसत चोमडेपणा करू नये.
समर्थ रामदास म्हणतात……..
आळसें सुख मानूं नये ।
चाहाडी मनास आणूं नये ।
शोधिल्याविण करूं नये ।
कार्य कांहीं ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०२/०२/१३
पूर्ण जाग आल्यावरही काही न करता सुस्त पडून राहाणे म्हणजे आळस. यात तात्पुरते सुख वाटले तरी पुढे शरीर निष्क्रीय होण्याचाच धोका जास्त. चोमडेपणा,चहाडी, चुगली स्वत:ही करू नये. आपल्याविषयी कोणी केेली तर संपूर्ण दुर्लक्ष करावे. यात आपलाच भरपूर वेळ वाचतो आणि योग्य गोष्टीकडे लावता येतो.
कुठलेही नवीन कार्य पूर्ण माहिती आणि पूर्वतयारी शिवाय हाती घेऊ नये. हेच उत्तमपुरूषाचे लक्षण होय.
(तूर्तास एवढेचं..!)